राजा राममोहन रॉय आणि सती प्रथा निवारण
- डॉ. बी.आर. आंबेडकर
ब्रजविनोद रॉय शेवटच्या घटका मोजत होते.
त्यासमयी त्यांना गंगाकिनारी आणले गेल. ब्रजविनोद रॉय यांना अंत्यसमयी त्यांना सिरामपोर जिल्ह्यातील श्यामाचरण भट्टाचार्य यांनी एक वर मागितला.
ब्रजविनोद बाबूंनी गंगेची शपथ घेउन त्यांना रुकार दिला. ह्यावर श्यामाचरण बाबूंनी वर मागितला की त्यांच्या कन्येचा, ब्रजविनोद बाबूंच्या सात पैकी एका पुत्राशी विवाह करावा. श्यामाचरण बाबू हे भंग (कमी दर्जाच्या) कुळातील तर होतेच शिवाय ते शाक्तही (शक्ती चे उपासक) होते आणि रार्ही ब्राम्हण असलेले रॉय बाबू हे वैष्णव (चैतन्यचे(विष्णू) उपासक) होते. शाक्त आणि वैष्णव यांच्यात बेटीसंबंध ही फार अवघड गोष्ट होती. पण रॉय बाबूंनी तर गंगामातेची शपथ घेउन वचन दिल होत.
रॉय बाबूंनी त्यांच्या सगळ्या पुत्रांना आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी विचारल असता रमाकांत बाबू सोडून इतर सर्वांनी नकार दिला.
यथासांग रमाकांत बाबू यांचा विवाह श्यामाचरण यांची कन्या तरीणी देवी, ज्या पुढे फूल ठकुरानी या नावाने ओळखल्या गेल्या, यांच्याशी झाला. या दांपत्याला पुढे दोन पुत्र, जगन्मोहन (की जगमोहन?) आणि राममोहन आणि एक कन्यारत्न प्राप्त झाले. हा राममोहन म्हणजेच राजा राम मोहन रॉय.
राजा राम मोहन रॉय यांना परंपरांनी जखडलेला भारत आणि सर्व परंपरा झुगारून देणारा भारत यांच्यामधील पूल अस म्हटल जात. त्यांच जीवन कार्य इतक प्रचंड आणि असाधारण आहे की त्याचा केवळ एकाच लेखात धावता आढावा घेणदेखील शक्य नाही.
त्यामुळ इथे या लेखात त्यांच्या सतीप्रथेविरुध्दच्या कार्याची फक्त ओळख करायचा हा एक प्रयत्न आहे. ह्यातील माहीती जास्तीत जास्त अचूक येइल यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला असला तरीदेखील सूक्ष्मशी चूक आढळल्यास तत्काळ निदर्शनास आणावी ही विनंती.
जन्म आणि शिक्षण
२२ मे १७७२ (१७७४?) रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळ त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.
तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल.
हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.
भटकत भटकत ते तिबेट पर्यंत गेले. तिथे बुद्ध धर्माच्या प्रमुख भूमीत त्या धर्माचा अभ्यास चालू केला. परंतू तिथ शिकवल्या जाणार्या एकेश्वरवादाची मते त्यांना पटली नाहीत. त्यांचे मत त्यांनी उघड बोलून दाखवल असता त्यांना हिंसेचा सामना करावा लागला, आणि प्रकरण जीवावर बेतल. त्यावेळी काही स्थानिक स्त्रीयांनी राम मोहन बाबूंचा जीव वाचवला. ह्या प्रसंगान त्यांच्या मनात स्त्रीयांविषयी अतिशय आदरभाव उत्पन्न झाला.
दरम्यानच्या काळात रमाकांतबाबूंनी पुत्राला शोधण्यासाठी काही लोक पाठवले होते. वडीलांचा निरोप मिळाल्यावर राम मोहन बाबू पुन्हा एकदा घरी आले. घरी आल्यावर वडीलांनी त्यांच लग्न लावून दिल.
सती प्रथेशी संबंध आणि विरोध
इ.स. १८१२ मधे त्यांचे थोरले बंधू जगन्मोहन यांचा मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीन जगन्मोहन यांच्या पत्नीला सती जायला लावल. राम मोहन यांनी त्याप्रसंगी विरोध केला, पण तो प्रकार थांबवू शकले नाहीत.
त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे. अर्थात ज्या समाजात स्त्रीला मूळातच दुय्यम स्थान होत (/आहे) आणि जिला स्वतःचा आवाजच नव्हता ती हा निर्णय स्वतः घेत असेल ही शक्यताही धूसरच आहे.
भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात. कलकत्त्याच्या स्मशानभूमीत वाद्यांच्या गजरात पतीच्या चितेवरती बळजबरीन जाळल्या जाणार्या स्त्रीया हे नेहमीच दृश्य असे. बरेचदा त्या स्त्रीला नशा येणारा भांग किंवा तत्सम पदार्थ दिला जात असे आणि त्या अमलाखाली असतानाच ती चितेवर गेली की तिला तिच्या मृत पतीच्या प्रेताशी बांधून टाकण्यात येई.
बंधू च्या मृत्यूनंतर अशाप्रकारे त्यांच्या पत्नीला देखील जाळल्यामुळ राम मोहन प्रचंड व्यथित झाले आणि त्यांनी सती प्रथे विरोधात मोहीम उघडली. राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्या स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत.
ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता.
त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणार्या स्त्रीयांची मोजणी सुरु केली.
सती प्रथेचे बळी
इ.स. १८१५ ते १८२८ या दरम्यान सती प्रथेमुळे किती हिंदू स्त्रीया प्राणाला मुकल्या याची सरकारी आकडेवारी खालीलप्रमाणे;
| १८१५ | १८१६ | १८१७ | १८१८ | १८१९ | १८२० | १८२१ | १८२२ | १८२३ | १८२४ | १८२५ | १८२६ | १८२७ | १८२८ | |
| कलकत्ता | २५३ | २८९ | ४४२ | ५४४ | ४२१ | ३७० | ३७२ | ३२८ | ३४० | ३७३ | ३९८ | ३२४ | ३३७ | ३०९ |
| ढाक्का | ३१ | २४ | ५२ | ५८ | ५५ | ५१ | ५२ | ४५ | ४० | ४० | १०१ | ६५ | ४९ | ४७ |
| मुर्शीदाबाद | ११ | २२ | ४२ | ३० | २५ | २१ | १२ | २२ | १३ | १४ | २१ | ८ | २ | १० |
| पटना | २० | २९ | ४९ | ५७ | ४० | ६२ | ६९ | ७० | ४९ | ४२ | ४७ | ६५ | ५५ | ५० |
| बनारस | ४८ | ६५ | १०३ | १३७ | २ | १०३ | ११४ | १०२ | १२१ | ९३ | ५५ | ४८ | ४९ | ३३ |
| बरेली | १५ | १३ | १९ | १३ | १७ | २० | १५ | १६ | १२ | १० | १७ | ८ | १८ | १० |
| एकूण | ३७८ | ४१२ | ७०७ | ८३९ | ६५० | ५९७ | ६५४ | ५८३ | ५५७ | ५७२ | ६३९ | ५११ | ५१७ | ४६३ |
राम मोहन रॉय यांच्यामते संपूर्ण बंगाल प्रांतात (जो आजच्या पश्चीम बंगालपेक्षा बराच मोठा होता) प्रत्यक्षात सती जाणार्या स्त्रीयांची संख्या या आकडेवारिच्या दसपट तरी असेल. ज्येष्ठ बंधूंच्या पत्नीच्या मृत्यूनंतर राम मोहन यांनी थेट स्मशानात जाउन सती जाणार्या स्त्रीयांना थांबवण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंगी ते यशस्वी देखील झाले.
१८१८ मधे प्रथेला विरोध करणारा एक लेख प्रसिद्ध केला. यामधे एक प्रथेचा समर्थक आणि एक विरोधक यांच्या संवादातून त्यांनी सती प्रथेच्या समर्थनार्थ दिल्या जाणार्या कारणांच खंडन केल आहे. त्यांनी मांडलेले बहुतांश मुद्दे हे आजही जसेच्या तसे, लागू होतात.
ह्या लेखात त्यांनी चर्चेला घेतलेले प्रमुख मुद्दे म्हणजे स्त्रीया ह्या मुळातच पुरुषांपेक्षा हीन आहेत, त्यांची शारिरिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी आहे. स्त्रीया निर्बुद्ध असतात, निर्णय घ्यायला सक्षम नसतात. त्यांच्यावरती (चारित्र्या बाबतीत) विश्वास ठेवला जाउ शकत नाही . त्या फार भावनिक असतात. हे आणि इतरही काही मुद्दयांचा समाचार त्या निबंधात घेतला आहे.
त्या काळच्या प्रथेच्या समर्थकांनी ही सगळी कारण हे स्त्रीच अस्तीत्वच गौण असत, तिला तिचा पती हाच परमेश्वर असतो आणि त्याच्याशिवाय तिच अस्तित्वच नाही हे सिद्ध करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला होता अस दिसतय. (“त्या काळच्या” समर्थकांनी अस म्हणायच कारण उपसंहारात आहे.)
सती जाणे ही वरवर जरी धार्मिक प्रथा दिसत असली तरी अनेकदा एखाद्या स्त्रीला सती जायला लावण्यात लोभी नातेवाईकांचादेखील हात असे. ह्यामुळ धर्माचा सर्रास आधार याकामी घेतला जात असे. त्यामुळ १८३० मधे, सरकारन १८२९ मधे या अमानुष प्रथेवर बंदी घातल्यानंतर, राम मोहन बाबूंनी Suttee and the Shastras असा एक लेख लिहीला. यामधे त्यांनी वेद, स्मृती, भगवद्गीता यांतील अनेक श्लोकांचा आधारे या प्रथेला शास्त्राधार नाही हे दाखवून दिल. त्यात त्यांनी अंगिर आणि व्यास ऋषी यांचे प्रथेचे समर्थन करणारे तर मनु, याज्ञवल्क्य, भगवद्गीता यांचे ही प्रथा सक्तीची नसून सर्वस्वी ऐच्छीक असल्याचे दाखले दिले आहेत.
फलित
४ डिसेंबर १८२९ रोजी, राजा राम मोहन रॉय आणि इतरांच्या प्रयत्नाला यश येउन, सती प्रथा बंद करण्याविषयीच विधेयक लॉर्ड विल्यम बेंन्टीन्क गव्हर्नर जनरल, व्ह्यायकाऊंट काँबरमीअर कमांडर-इन-चीफ, डब्ल्यू. बी. बेयले आणि सर सी. टी. मेटकाफ यांच्या संयुक्त समीतीन संमत केल.
१६ जानेवारी १८३० ला राम मोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेन्टीन्कला सती प्रथेवर कायद्यान बंदी घातल्याबद्दल अभिनंदन आणि आभाराच एक पत्र पाठवल.
परंतू यानंतरही सती प्रथेच्या समर्थक धर्म मार्तंडांनी, तत्कालीन सर्वोच्च न्यायपीठ म्हणजेच प्रीव्ही कौन्सीलपुढे याचिका दाखल केली. दिल्लीचा मुघल बादशहा अकबर दुसरा याच्यावतीन त्याची तनखा वाढवून देण्यासाठी “राजा” हा किताब देउन राम मोहन रॉय यांची नियुक्ती झाली होती. त्या बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजा राम मोहन रॉय १८३० साली इंग्लडला गेले.
तिथे असतानाच त्यांनी सरकारपुढे सती प्रथेविरोधात पुन्हा एकदा बाजू मांडली.
११ जुलै १८३२ रोजी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सीलपुढे या विधेयकाला विरोध करणारी याचिका फेटाळण्यात आली.
इंग्लंडमधील स्टेपलटन या गावी २७ सप्टेंबर १८३३ रोजी या महात्म्यान या जगाचा निरोप घेतला. दक्षिण ब्रिस्टल मधील आर्नोस वॅले दफनभूमीत त्यांच दफन करण्यात आल.
उपसंहार
ब्रिटीश कंपनी सरकारन १८२९ मधे कायदा करून यावर बंदी आणूनही १९४३ नंतर किमान ४३ स्त्रीया सती गेल्याची नोंद आहे.
४ सप्टेंबर १९८७ रोजी, राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील देवराला गावात १८ वर्षाची रूप कुंवर सती गेली. रूप कुंवरच्या सती जाण्याचे उदात्तीकरण करण्याच्या आरोपाखाली ज्या ११ लोकांवर गुन्हा दाखल केला त्या सर्वांना जयपूरच्या विशेष न्यायालयान “सबळ पुराव्याअभावी” ३१ जानेवारी २००४ रोजी मुक्त केल. याहून वाईट गोष्ट म्हणजे रूप कुंवर चे एक मंदीर देखील बांधण्यात आल आहे जिथ आता नियमीत यात्रा भरते आणि त्या यात्रेवर बंदी घालायला (सती प्रथेच उदात्तीकरण करायला कायद्यान मनाई असताना देखील) न्यायालयान नकार दिला आहे.
अलीकडील घटना: छत्तीसगढच्या रायपूर जिल्ह्यातील चेचेर गावची रहिवासी असलेली ७१ वर्षीय लालमती नावाची महिला १३ ऑक्टोबर २००८ रोजी सती गेली.
संदर्भः
१. Raja Ram Mohun Roy His Life Writings and Speeches
२. Sati Tradition – Widow Burning in India: A Socio- legal Examination
३. विकीपीडीया

